‘धरणसूक्त’ : प्रभावी निसर्गचित्रणे, सहजतेने उभ्या राहणाऱ्या व्यक्तिरेखा, तांत्रिक बाबींना मानवी व्यवहाराची जोड, जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक वृत्ती, यांमुळे ही मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी ठरते

कादंबरीचे लेखक विलास शेळके हे स्वत: प्रयोगशील अभियंते आहेत. शासनाच्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यामुळेच असा एक आगळावेगळा अनुभव ते आपल्या कादंबरीतून साकार करू शकलेले आहेत, असे म्हणावे लागते. याचा अर्थ असा की, जीवनाच्या विविध क्षेत्रांतील प्रतिभावंत जोपर्यंत साहित्याच्या क्षेत्रात येत नाहीत, तोपर्यंत मराठी साहित्याचे पात्र विस्तृत होणार नाही.......

समाजवादी आणि गांधीवादी जीवनदृष्टी घेऊन राजकारण करू इच्छिणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाने आपल्या आयुष्यात आलेल्या मोठ्या, कर्तबगार, तऱ्हेवाईक, तसेच ‘यशस्वी’ माणसांचा घेतलेला हा शोध आहे

लोकोत्तर व कर्तबगार व्यक्तींच्या व्यक्तिचित्रांच्या अनुषंगाने जात, धर्म, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजिक न्याय, समाजवादी राजकारण, हिंदुत्ववाद्यांचे देशाला विषमतेकडे आणि दुःस्थितीकडे नेणारे धोरण या साऱ्यांची चर्चा ‘व्यक्तिरंग’मध्ये येते. त्याचप्रमाणे गेल्या पन्नास-साठ वर्षांतील भारतीय राजकारण आणि समाजकारणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणूनही या पुस्तकाचे महत्त्व वादातीत आहे.......